‘जाऊंद्याना बाळासाहेब’च्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी दिग्दर्शनात तर संगीतकार अजय-अतुल निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत. ‘जाऊद्यांना बाळासाहेब’ हा काहीसा ग्रामीण बाज असणारा चित्रपट असला तरी त्यातून जे भाष्य दिग्दर्शकाला करायचं आहे ते सार्वकालिक आहे, असं दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांना वाटतं. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत आणि त्याची जबाबदारी अजय-अतुल यांनीच सांभाळली आहे.
![](https://i.ytimg.com/vi/ZJ4nrmmqh0k/maxresdefault.jpg)